• Contact Us
  • Home
Wednesday, June 17, 2026
  • Login
Ugavatiche Rang
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
No Result
View All Result

बीडकरांची रेल्वेची स्वप्नपूर्ती… दशकांची प्रतीक्षा संपली!

महेश माधवराव वाघमारे by महेश माधवराव वाघमारे
September 17, 2025
in ऑनलाईन वृत्तसेवा
0

बीड (प्रतिनिधी ) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज बीड येथे अमळनेर (भां) ते बीड नवीन रेल्वे मार्गाचे उदघाटन आणि बीड ते अहिल्यानगर ट्रेनचा हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ केला.मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, अनेक दशकांच्या प्रतीक्षेनंतर बीडमध्ये रेल्वे सुरू होणे हा जनतेसाठी स्वप्नपूर्तीचा क्षण आहे. स्व. गोपीनाथराव मुंडे आणि माजी खासदार केशरकाकू क्षीरसागर यांनी या रेल्वेचे स्वप्न पाहिले होते. विशेषतः स्व. गोपीनाथराव मुंडे यांनी बीडच्या रेल्वेचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मोठा संघर्ष केला. आज स्व. गोपीनाथराव मुंडे यांचे स्वप्न साकार झाले असून, ही रेल्वे म्हणजे त्यांना दिलेली खरी आदरांजली आहे.

2014 नंतर केंद्र आणि राज्य सरकारने संयुक्तपणे निधी उपलब्ध करून या प्रकल्पाला गती दिली. मागील 10 वर्षांत मोदी सरकारने मराठवाड्यातील रेल्वे प्रकल्पांसाठी ₹21,000 कोटी दिले, तर त्यापूर्वीच्या 10 वर्षांत केवळ ₹450 कोटी मिळाले होते. आज या धोरणात्मक पाठबळामुळे बीडसह मराठवाड्यातील जनतेचे रेल्वेचे स्वप्न पूर्ण होत आहे. रेल्वे येणे म्हणजे फक्त गाडी येणे नव्हे, तर त्या माध्यमातून विकासाची वाहिनी पोहोचते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, मराठवाड्याच्या वाट्याचे 23 टीएमसी पाणी आष्टीपर्यंत आणले आहे. आता कृष्णा खोऱ्यातील पुराचे 36 टीएमसी पाणी उजनीमध्ये आणून तेथून मराठवाड्यापर्यंत आणण्याचे काम सुरू केले जाईल. तसेच, उल्हास खोऱ्यातील 54 टीएमसी पाणी गोदावरीच्या खोऱ्यात आणून मराठवाड्यामध्ये पाण्याचे जाळे निर्माण केले जाईल. यामार्फत मराठवाड्यातील दुष्काळ हा भूतकाळ करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

17 सप्टेंबर हा मराठवाडा मुक्ती दिन असून, याच दिवशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी हा ऐतिहासिक रेल्वे प्रकल्प बीडकरांच्या सेवेत अर्पण होत असल्याने आजचा दिवस विशेष असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी अधोरेखित केले.

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री पंकजा मुंडे व इतर मान्यवर उपस्थित होते.

Previous Post

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर पीएनजीची “प्युअर प्राइस ऑफर.”

Next Post

आ.संदीप क्षीरसागर नागरिकांच्या मदतीसाठी सरसावले

महेश माधवराव वाघमारे

महेश माधवराव वाघमारे

महेश वाघमारे, बीड

Next Post

आ.संदीप क्षीरसागर नागरिकांच्या मदतीसाठी सरसावले

ताज्या बातम्या

शेतकऱ्यांना कर्जमाफी-देवेंद्र फडणवीस

June 2, 2026

विश्वकल्याणार्थ ९० दांपत्यांच्या ‘पंचकुंडीय भव्य विष्णूयाग’ संपन्न

June 2, 2026

अविनाश पाठक यास 7 दिवसाची कोठडी…

May 8, 2026

तन – मन – मेंदू ला बलवान बनवणारे देवदूत,डॉ विशाल पिंगळकर.

May 6, 2026

जादूई स्वर हरपला ; आशा भोसले यांचं निधन!

April 12, 2026

अजितदादांच्या स्वप्नातील जिल्हा घडविण्यासाठी सुनेत्राताई कटिबध्द

February 12, 2026

  • Contact Us
  • Home

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.