
आष्टी -” मेरे पास देवेंद्र फडणवीस है” या सुरेश धस यांच्या डायलॉगला “मी शिवगामी आहे आणि या नात्याने देवेंद्र फडणवीस यांची आई आहे” या डायलॉगने पंकजाताई मुंडे यांनी उत्तर देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत राजकिय मतभेद बाजूला ठेवत दिलखुलास भाषण केले.आ.सुरेश धस यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत भाषण केले,ते म्हणाले मी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा लाडका आहे, त्यामुळे अनेकजण मला विचारतात तुमच्याकडे काय आहे तेव्हा मी सांगतो मेरे पास देवेंद्र फडणवीस है.

तुम्ही पाटोदा आणि शिरूर तालुक्यासाठी पाणी पुरवठ्याची योजना मंजूर करा अशी मागणी आष्टीचे आ. सुरेश धस यांनी केली. त्यासोबतच बीड जिल्ह्यातील वाळू, आणि राख माफियाना मकोका लावा अशी मागणी धस यांनी केली.
आष्टी तालुक्यातील खुंटेफळ साठवण तलावाच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. आ सुरेश धस पुढे म्हणाले कि, या प्रकल्पमुळे आष्टी तालुक्यातील दुष्काळ कायमचा मिटणार आहे. यपाटोदा आणि शिरूर तालुक्यासाठी अधिकची पाणी पुरवठा योजना करावी अशी मागणी त्यांनी केली.
बदनामी केली कोणी ? -धस
फडणवीस साहेब, काही लोक म्हणतात बीड जिल्ह्याची बदनामी केली जातं आहे. पन या जिल्ह्याने क्रांतिसिंह नाना पाटील, राखमाजी गावडे, केशरकाकु क्षीरसागर, बबनराव ढाकणे, गोपीनाथ मुंडे यांच्यासारखे नेते दिले. या जिल्ह्याने अनेक जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक दिले, पन काही लोकांनी गुंडाना राजश्रय दिला. त्यामुळे राख आणि वाळू माफियाना मकोका लावा अशी मागणी आ धस यांनी केली.
मी शिवगामी-पंकजाताई मुंडे
या भागातले लोक शिवगामी म्हणतात त्या अर्थाने मी देवेंद्र फडणवीस यांची माता आहे, त्यामुळे त्यांच्याप्रति माझ्या मनात ममत्वभाव आणि आदरभाव आहे. सुरेश अण्णा तुम्ही प्रेम केलं मी पण मनापासुन प्रेम करणारी आहे, मेरा वचन ही मेरा शासन है असं म्हणत राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे यांनी सभा गाजवली.
आष्टी येथील कार्यक्रमात त्या बोलत होत्या. पंकजाताई मुंडे पुढे म्हणाल्या कि, मी या कार्यक्रमाला येणार कि नाही अशी चर्चा होती, मात्र कार्यक्रम शासकीय आहे अन मी शासनात मंत्री आहे. देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आहे. सुरेश अण्णा तुम्ही जयदत्त च्या लग्नाला मला साडीचोळी देऊन निमंत्रण दिलं, मी आले, आता सागरच्या लग्नाला निमंत्रण दिलं तर नक्की येणार.
मला पराभूत करून निवडून आलेले खासदार बजरंग सोनवणे इथे आहेत, बीड जिल्ह्याने अनेकांना संधी दिली. जिल्ह्यात पाच युतीचे आमदार असताना देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आजही महायुतीचे पाच आमदार आहेत आणि फडणवीस मुख्यमंत्री आहेत. हा योगायोग आहे.मंत्री पंकजा मुंडे यांनी आपल्या भाषणात सुरेश धस यांच्यासह व्यासपीठावर उपस्थित सर्वांच्या नावाचा उल्लेख करत जोरदार भाषण केले. त्यांच्या भाषणामुळे धस आणि पंकजा मुंडे यांच्यातील वाद कमी झाल्याचे चित्र दिसून आले.