• Contact Us
  • Home
Wednesday, February 4, 2026
  • Login
Ugavatiche Rang
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
No Result
View All Result

मतदान का वाढले? एस.चोक्कलिंगम यांनी केले स्पष्ट…

महेश माधवराव वाघमारे by महेश माधवराव वाघमारे
November 30, 2024
in ऑनलाईन वृत्तसेवा
0

निवडणुकीचा निकाल एकतर्फी लागला असला तरी महायुतीमध्ये खात्यांवरुन आणि पदांवरुन चर्चा सुरु आहे. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाचा दावा सोडला असला तरी त्यांना गृहखाते व नगरविकास खात्याची मागणी केली आहे. आता भाजप हे मान्य करणार का याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. दरम्यान, कॉंग्रेसकडून धक्कादायक निकाल लागल्यानंतर निवडणूक आयोगावर गंभीर आरोप करण्यात येत होते. त्यावर आता एका अधिकाऱ्याने स्पष्टीकरण दिले आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा अनपेक्षित असा निकाल हाती आला आहे. महाविकास आघाडीला यामुळे मोठा फटका बसला. अगदी विरोधी पक्षनेता पदावर दावा करण्याएवढ्या देखील जागा महाविकास आघाडीच्या कोणत्याच घटक पक्षाला मिळवता आल्या नाहीत. यानंतर कॉंग्रेसने ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळा आणि निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले. यानंतर आता केंद्रीय निवडणूक आयोगाचे महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी सोशल मीडियावर पोस्ट करुन गंभीर आरोपांवर स्पष्टीकरण दिले आहे. एस. चोक्कलिंगम म्हणाले की, सायंकाळी शेवटच्या तासात मतदानाचा टक्का वाढणे ही अतिशय सामान्य बाब आहे. निमशहरी आणि शहरी भागात शेवटच्या काही तासात मतदार मोठ्या प्रमाणात बाहेर पडतात. त्यामुळे मतदानाचा टक्का वाढतो, असे मत एस. चोक्कलिंगम यांनी व्यक्त केले.

एस. चोक्कलिंगम म्हणाले की,”सायंकाळी सहा वाजण्याची आधी जो मतदार रांगेत येऊन उभा राहतो, त्याचे मतदान संपेपर्यंत मतदानाची प्रक्रिया सुरूच राहते. ही रांग संपण्यासाठी कधी कधी सहा वाजण्याची मर्यादाही पुढे जाते. २०१९ साली सायंकाळी ५ वाजता जवळपास ५४.४ टक्के मतदान झाले होते. त्यानंतर अंतिम मतदानाची आकडेवारी ६१.१ टक्के झाली होती, असे मत एस. चोक्कलिंगम यांनी व्यक्त केले आहे.

पुढे ते म्हणाले की, सायंकाळी पाच वाजेपर्यंत झालेल्या मतदानाची माहिती ही टेलिफोनवरून तोंडी दिली जाते. मतदान संपल्यानंतर मात्र मतदानकेंद्रावरील अधिकारी फॉर्म १७-सी भरून देतात, ज्यामध्ये अंतिम आकडेवारी नमूद केलेली असते. असे स्पष्टीकरण महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी दिले आहे. त्यामुळे कॉंग्रेसने निवडणूक आयोगावर केलेल्या गंभीर आरोपांवर आता पूर्णविराम लागण्याची शक्यता आहे. सोशल मीडियावर पोस्ट करुन एस. चोक्कलिंगम यांनी आपले मत व्यक्त केले आहे.

Previous Post

।।आज शनी अमावस्या।

Next Post

मला वाटतं पांडुरंगा तू निवडणूकीला उभं राहावं-संकर्षणची कविता…

महेश माधवराव वाघमारे

महेश माधवराव वाघमारे

महेश वाघमारे, बीड

Next Post

मला वाटतं पांडुरंगा तू निवडणूकीला उभं राहावं-संकर्षणची कविता…

ताज्या बातम्या

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

January 31, 2026

घोषवादन – नवति स्वरशक्तीचा;आज बीड येथे जागर ….

January 4, 2026

गिल आऊट ईशान इन:टीम इंडिया घोषित..

December 20, 2025
युट्युब चॅनेलला न प निवडणुकीत मतदान केंद्रावर प्रवेश नाही.

युट्युब चॅनेलला न प निवडणुकीत मतदान केंद्रावर प्रवेश नाही.

November 26, 2025
पीएनजी ज्वेलर्स’तर्फे नव्या पिढीच्या वधूसाठी ‘प्रथा’ संग्रह सादर

पीएनजी ज्वेलर्स’तर्फे नव्या पिढीच्या वधूसाठी ‘प्रथा’ संग्रह सादर

November 18, 2025
स्मिता विष्णू वाघमारे एकमेव अनुभवी उमेदवार.

स्मिता विष्णू वाघमारे एकमेव अनुभवी उमेदवार.

November 17, 2025

  • Contact Us
  • Home

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.