मंगळवारी रद्द झालेली राज्य मंत्रीमंडळाची बैठक आता गुरुवारी होण्याची शक्यता आहे. पुढील आठवड्यात आचारसंहिता लागू होण्याची शक्यता असल्याने ही महायुती सरकारची शेवटची मंत्रीमंडळाची बैठक असेल असं देखील बोललं जात आहे.मंत्रीमंडळाच्या बैठकीत निवडणुकांच्या तोंडावर नवीन योजनांच्या घोषणा होतील, असं सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.
राज्य मंत्रीमंडळाची बैठक मंगळवारी रद्द करण्यात आली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तब्बेत खराब असल्याने ही बैठक रद्द केल्याचं यावेली सांगण्यात आलं होत. त्यानंतर आता ही मंत्रीमंडळाची बैठक गुरुवारी होणार असल्याचं बोललं जात आहे. ही महायुती सरकारची शेवटची मंत्रीमंडळाची बैठक असेल अशी शक्यता आहे. कारण पुढील आठवड्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही शेवटची बैठक असेल का ? याबद्दल चर्चा आहे. त्याचबरोबर आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर या बैठकीत अनेक मोठ्या घोषणा केल्या जातील असं देखील बोललं जात आहे.