• Contact Us
  • Home
Saturday, June 7, 2025
  • Login
Ugavatiche Rang
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
No Result
View All Result

मीडिया ट्रायलने बीड जिल्ह्याची नाहक बदनामी-धनंजय मुंडे विस्ताराने बोलले.

महेश माधवराव वाघमारे by महेश माधवराव वाघमारे
January 30, 2025
in ऑनलाईन वृत्तसेवा, बीड जिल्हा
0

बीड(प्रतिनिधी) काही अफवा पसरवून, अर्धवट माहितीच्या आधारे मीडिया ट्रायल चालवून बीड जिल्ह्याची नको ती प्रतिमा बाहेर प्रसिद्ध केली जात असून, सबंध जिल्ह्याची नाहक बदनामी होत आहे. सामाजिक सलोखा अबाधित रहावा तसेच जिल्ह्याची बदनामी थांबावी, याबाबतही ठोस उपाययोजना करण्याची मागणी पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे ना.धनंजय मुंडे यांनी केली आहे.अजितदादा यांच्याकडे केली.बीड जिल्हा नियोजन समितीची बैठक नवनिर्वाचित पालकमंत्री तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली.या बैठकीस ना.धनंजय मुंडे हेही उपस्थित होते. यावेळी त्यांनी ते पाच वर्षे पालकमंत्री असतांना केलेल्या कामाबद्दल सांगितले. त्यांनी याबाबत फेसबुकवर पोस्ट करून माहिती दिली आहे. ते पोस्टमध्ये म्हणतात की, मागील चार वर्षाच्या पालकमंत्री कार्यकाळातील कामकाजाचा लेखाजोखा मांडला. यावेळी पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे यांसह जिल्हा नियोजन समितीचे नामनिर्देशित सदस्य, प्रशासकीय अधिकारी आदी उपस्थित होते.

मागच्या पाच पैकी चार वर्षे मी बीड जिल्ह्याचा पालकमंत्री होतो. त्यात साधारण दोन ते अडीच वर्षे ही कोविड मध्ये गेली. त्या काळात रुग्णांना तातडीचे योग्य उपचार मिळवून देणे तसेच लोकांचे प्राण वाचवणे, आरोग्य यंत्रणा अधिक बळकट करणे ही कामे प्राधान्याने करत कोविडच्या काळामध्ये जिल्ह्यातील जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करण्यात आले. अनेक कोविड सेंटर, ऑक्सिजन प्लांट, नवीन रुग्णवाहिका खरेदी, विविध वैद्यकीय साहित्य अशा आरोग्य यंत्रणांना बळकटी देणाऱ्या बाबींवरती मोठ्या प्रमाणात जिल्हा नियोजन समितीचा निधी त्याकाळी खर्च केला गेला.

२०२४ सालचे अतिवृष्टी अनुदान मंजूर होऊन आलेले आहे, त्याचे वितरण लवकर पूर्ण केले जावे अशी विनंती केली.

माझ्या कार्यकाळात जिल्ह्यात प्रधानमंत्री ग्रामसडक योजना व मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत सुमारे ११०० किमी रस्त्यांच्या विकासाचे काम पूर्ण झाले.

ना. पंकजाताई मुंडे यांच्या पालकमंत्री कार्यकाळात मंजूर होऊन सुरू झालेले जिल्हा परिषद इमारत बांधकाम माझ्या कार्यकाळात पूर्णत्वास गेले. पंकजाताई मुंडे यांचे पाच वर्ष व त्यापुढे मला मिळालेला ४ वर्षांचा कालावधी यात आम्ही सर्वसमावेशक विकास साधण्याचा पुरेपूर प्रयत्न केला.

जिल्हाधिकारी कार्यालय इमारत बांधकाम सुरू आहे. मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीचे बांधकाम सुरू आहे. परळी ते बीड या महत्त्वाच्या रस्ता रुंदीकरणचे काम सुरू आहे. यांसह जिल्ह्यात न्यायलये, प्रशासकीय इमारती, विश्रामगृह, शासकीय रुग्णालयांच्या दर्जोन्नती व बांधकाम अशा अनेक महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधांची कामे या काळात केली गेली तर अनेक कामे सध्या प्रगतीपथावर आहेत, कृषी भवन, महिला व बालविकास भवन, सीताफळ इस्टेट अशी अनेक मंजूर असलेली कामे आता दादांच्या नेतृत्वात पूर्णत्वास जातील, अशी अपेक्षा व्यक्त केली.

बीड जिल्हा पोलिस दलास आवश्यक ७३ नवीन वाहने, ११३ मोटार सायकल या बाबी नियोजन समितीच्या माध्यमातून देण्यात आल्या. अशी अनेक सकारात्मक कामे करताना सर्व तालुक्यांना समान निधी देण्याचीही पुरेपूर काळजी घेण्यात आली. ऐकीव आणि अर्धवट माहितीच्या आधारे नियोजन समितीच्या कामकाजावर मागील काही दिवसात करण्यात आलेल्या निराधार आरोपांना पुरावण्यांसह खोडून काढण्याचे काम संबंधित यंत्रणांकडून केले जाईल.

बीड जिल्ह्यात मागील काही महिन्यांपासून जातीयवादाचे विष काही लोकांकडून जाणीवपूर्वक पेरले जात आहे. याचा परिणाम जनतेपासून ते अगदी प्रशासनावर सुध्दा झालेला दिसून येत असून, जिल्हा प्रशासनात सुध्दा उभी फूट पडली आहे, हे नाकारता येणार नाही.

कोण कधी कुठल्या अधिकाऱ्याचे नाव आणि जात काढून काय आरोप करतील ते सांगता येत नाही, त्यामुळे शिपाई ते जिल्हाधिकारी सर्वच अधिकारी – कर्मचारी यांच्यावरती भीती व दडपणाचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत आपल्या पदांना व कामांना हे अधिकारी कसा न्याय देऊ शकतील? त्यामुळे अधिकारी कर्मचारी यांची एक विशिष्ट रणनीती ठरवून त्यांना भयमुक्त वातावरण तयार करून देण्याबाबत तात्काळ ठोस उपाययोजना करण्याची गरज असल्याचे स्पष्ट मत व्यक्त केले.

दरम्यान काही अफवा पसरवून, अर्धवट माहितीच्या आधारे मीडिया ट्रायल चालवून बीड जिल्ह्याची नको ती प्रतिमा बाहेर प्रसिद्ध केली जात असून, सबंध जिल्ह्याची नाहक बदनामी होत आहे. सामाजिक सलोखा अबाधित रहावा तसेच जिल्ह्याची बदनामी थांबावी, याबाबतही ठोस उपाययोजना करण्याची मागणी अजितदादा यांच्याकडे केली.

Previous Post

मनोज जरांगेंचे उपोषण स्थगित ,आता मुंबईत लढा.

Next Post

ग्रामीण भारताचा चेहरामोहरा बदलणारा अर्थसंकल्प-फडणवीस

महेश माधवराव वाघमारे

महेश माधवराव वाघमारे

विकास वामनराव कुलकर्णी (उमापूरकर ) -कार्यकारी संपादक.-

Next Post

ग्रामीण भारताचा चेहरामोहरा बदलणारा अर्थसंकल्प-फडणवीस

ताज्या बातम्या

बिंदुसरा स्वच्छ झाली ; आ.संदीप क्षीरसागरांनी मानले अजितदादांचे आभार

June 7, 2025

भाजप जिल्हाध्यक्षपदी शंकर देशमुख कायम.

May 31, 2025

धार्मिक ऐक्यासाठी समस्त जातींचे संघटन करण्याचे महान कार्य वीर सावरकरांनी केले-डॉ. सारिका क्षीरसागर.

May 28, 2025

सोयाबीन, तूर, मुगाची आधारभूत किंमत वाढवली…

May 28, 2025

आला रे आला ,मान्सून आला..

May 25, 2025

भारतीय संघाच्या कर्णधारपदी शुभमन गिल.

May 24, 2025

  • Contact Us
  • Home

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.