
मुंबई(प्रतिनिधी) इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट संघाच्या कसोटी कर्णधारपदी शुभमन गिल तर उपकर्णधारपदी ऋषभ पंत यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर बीसीसीआयने नव्या कर्णधाराची घोषणा केली आहे.
कसा आहे संघ?
शुभमन गिल (कर्णधार)), ऋषभ पंत (यष्टिरक्षक उपकर्णधार), यशस्वी जायसवाल, केएल राहुल, साई सुदर्शन, अभिमन्यु ईश्वरन, करुण नायर, नितीश कुमार रेड्डी, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (यष्टिरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, शार्दूल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, आकाश दीप, अर्शदीप सिंह, कुलदीप यादव
कोण आहे नवा कर्णधार?
बीसीसीआयने शुभमन गिलच्या गळ्यात कर्णधारपदाची माळ घातली आहे. गिलने 2020 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध मेलबर्न येथे कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होतं. पहिल्या कसोटी सामन्यात त्याने 45 आणि 35* धावांची खेळी होती. शुभमन गिलने आतापर्यंत 25 कसोटी सामने खेळले असून 1497 धावा केल्या आहेत. तसेच त्याने 5 शतके आणि 7 अर्धशतके झळकावली आहेत.

कसोटी मालिकेचं वेळापत्रक
दरम्यान, २० जूनपासून भारत आणि इंग्लंड संघात ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. यापैकी पहिली कसोटी 20-24 जून (लॉर्ड्स), दुसरा कसोटी सामना २ ते ६ जुलै (बर्मिंगहॅम), तिसरा कसोटी सामना 10 ते 14 जुलै (लॉर्ड्स), चौथा कसोटी सामना 23 ते 27 जुलै (मँचेस्टर) आणि पाचवा कसोटी सामना 31 जुलै ते 4 ऑगस्टदरम्यान (ओव्हल, लंडन) खेळवला जाणार आहे.
नव्या पर्वाची सुरुवात
महत्त्वाचे म्हणजे भारताचा इंग्लंड दौरा दोन्ही संघांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. कारण भारत आणि इंग्लंड या कसोटी मालिकेतून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप २०२५-२७ पर्वातील मोहिमेची सुरुवात करणार आहेत. त्यामुळे पहिल्याच कसोटी मालिकेत चांगली कामगिरी करण्यासाठी दोन्ही संघ उत्सुक असणार आहेत.