
नवी दिल्ली (प्रतिनिधी) टेरर आणि टॉक एकत्र चालणार नाही. पाणी आणि रक्ताचे पाटही एकत्र वाहणार नाही. आज आम्ही जगाला सांगू इच्छितो की, जर पाकिस्तानशी चर्चा करायची असेल तर ती पाकव्याप्त काश्मीर आणि दहशतवादी कारवाया यांच्यावरच होईल असे पंतप्रधान नरेंद्र मोदी उणी जनतेला संबोधित करतांना देशवासियांना ग्वाही दिली.ऑपरेशन सिंदूर नंतर, पंतप्रधान मोदींनी राष्ट्राला उद्देशून आज भाषण केले. यावेळी त्यांनी, ‘आपण सर्वांनी गेल्या काही दिवसांत देशाची ताकद आणि संयम दोन्ही पाहिले आहे. सर्वप्रथम, मी प्रत्येक भारतीयाच्या वतीने भारताच्या बलाढ्य सैन्याला, सशस्त्र दलांना, आपल्या गुप्तचर संस्थांना, आपल्या शास्त्रज्ञांना सलाम करतो. ऑपरेशन सिंदूरची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आपल्या शूर सैनिकांनी अपार धैर्य दाखवले असल्याचे म्हटलं आहे.

ऑपरेशन सिंदूर नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच देशाला संबोधित केले. पंतप्रधान मोदींनी ऑपरेशन सिंदूर हे भारताच्या प्रत्येक मुली, बहिणी आणि आईला समर्पित असल्याचे सांगितले आहे. यावेळी ते म्हणाले की, पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारून पर्यटकांची हत्या केली. हा देश तोडण्याचा घृणास्पद प्रयत्न होता. पण ऑपरेशन सिंदूरमधून आपल्या सैनिकांनी पाकिस्तानला योग्य उत्तर दिलं आहे.शास्त्रसंधीची अमेरिकेकडून झालेली घोषणा आणि त्यानंतर सरकारच्या निर्णयावर होणारी टीका या पार्श्वभूमीवर मोदी काय बोलणार, याची उत्सुकता होती.