• Contact Us
  • Home
Monday, August 4, 2025
  • Login
Ugavatiche Rang
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
No Result
View All Result

एकच उमेदवार द्यावा लागेल; जरांगे समर्थक संभ्रमात

महेश माधवराव वाघमारे by महेश माधवराव वाघमारे
October 24, 2024
in ऑनलाईन वृत्तसेवा
0

काही मतदारसंघांमध्ये एकच उमेदवार देण्यावाचून पर्याय नाही असं विधान मनोज जरांगे यांनी केलं आहे, 29 किंवा 30 तारखेला मतदार संघ आणि उमेदवार ठरवू असंही ते म्हणाले आहेत,त्यामुळे जरांगे समर्थकात थोडा संभ्रम निर्माण झाला आहे.

अंतरवालीत बोलताना जरांगे म्हणाले की, प्रत्येकालाच उभं राहायचं आहे त्यामुळे मी सर्वांना बोलवून घेईन. ज्यांनी ऐकले नाही त्यांच्यावरही नाराज होणार नाही. सर्वांनी 30-40 दिवस कष्ट घेतले तर पाच वर्ष सर्व जनता आनंदी राहील असं भावनिक आवाहन करीत आज ते उमेदवार जाहीर करणार नसल्याचं जरांगे यांनी स्पष्ट केलंय.ते म्हणाले सर्वांना हात जोडून विनंती करतो की एकच जण उभा रहा. किती मतदारसंघ का
लढायचे हे आज जाहीर करायचे नाही.

प्रत्येक मतदारसंघात चार ते पाच जणांनी फॉर्म भरून ठेवायचे आहेत. 29 किंवा 30 तारखेला मतदार संघ जाहीर करू. तेव्हाच उमेदवार ही जाहीर करू. चिन्ह आल्याशिवाय उपयोग नाही असं मनोज जरांगे म्हणाले आहेत. दरम्यान, निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या तारखांनुसार विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. 29 ऑक्टोबर ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख असणार आहे.

आधी मराठा आरक्षणाची मागणी, नंतर महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांवर मराठा उमेदवार, पाडापाडीचं गणित असं जाहीर करणाऱ्या मनोज जरांगे यांनी एकाच जातीच्या पाठिंब्यावर निवडणूक लढवता येणार नाही. सर्वांना सोबत घेऊन राजकीय समिकरण जुळवणार असंल्याचं वक्तव्य केलं आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आता अवघे ४ दिवस शिल्लक असताना राजकीय समिकरण जुळवून कोणत्या मतदारसंघात उमेदवारी जाहीर करायची हे मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे ठरवणार आहेत. त्यासाठी सुरवातीला संभाजीनगर जिल्हातील इच्छुक उमेदवारांची बैठक होणार आहे. या बैठकीत एका मतदारसंघात एकच उमेदवार उभा रहावा या साठी मनोज जरांगे मार्गदर्शन करतील. 25 ते 27 या काळात आपलं राजकीय समिकरण जुळेल असं त्यांनी माध्यमांना सांगितलं.निवडणूक लढवण्याची भूमिका जाहीर केल्यानंतर त्यांच्याकडे इच्छुक उमेदवारांचे अनेक अर्ज आल्याचे त्यांनी सांगितले. 20 ऑक्टोबरला इच्छुकांची बैठक घेत लढायचं की पाडायचं हे त्यांनी ठरवलं होतं. काही ठराविक मतदारसंघातून उमेदवार उभे करण्याचेही त्यांनी सांगितलं होतं. कोणत्या मतदारसंघात उमेदवार उभे करायचे हे पुढच्या बैठकीत ठरवू असंही ते म्हणाले होते. 24 ऑक्टोबरला म्हणजे आज इच्छुकांची अंतरवली सराटीत बैठक चालू आहे. पण आज उमेदवार जाहीर करणार नसल्याचं त्यांनी सांगितलं. 29 ते 30 तारखेला मतदार संघ जाहीर करून उमेदवार जाहीर करू असेही ते म्हणालेत. एकाच वेळी ते मतदारसंघ निहाय उमेदवार जाहीर करणार आहेत. तर दुसरीकडे एकच उमेदवार ठरवण्याचं आज फायनल करू असेही ते म्हणाले आहेत. त्यामुळे मनोज जरांगे हे संभ्रमात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली। आहे.

एकच उमेदवार द्यावा लागेल; जरांगे समर्थक संभ्रमात

काही मतदारसंघांमध्ये एकच उमेदवार देण्यावाचून पर्याय नाही असं विधान मनोज जरांगे यांनी केलं आहे, 29 किंवा 30 तारखेला मतदार संघ आणि उमेदवार ठरवू असंही ते म्हणाले आहेत,त्यामुळे जरांगे समर्थकात थोडा संभ्रम निर्माण झाला आहे.

अंतरवालीत बोलताना जरांगे म्हणाले की, प्रत्येकालाच उभं राहायचं आहे त्यामुळे मी सर्वांना बोलवून घेईन. ज्यांनी ऐकले नाही त्यांच्यावरही नाराज होणार नाही. सर्वांनी 30-40 दिवस कष्ट घेतले तर पाच वर्ष सर्व जनता आनंदी राहील असं भावनिक आवाहन करीत आज ते उमेदवार जाहीर करणार नसल्याचं जरांगे यांनी स्पष्ट केलंय.ते म्हणाले सर्वांना हात जोडून विनंती करतो की एकच जण उभा रहा. किती मतदारसंघ का
लढायचे हे आज जाहीर करायचे नाही.

प्रत्येक मतदारसंघात चार ते पाच जणांनी फॉर्म भरून ठेवायचे आहेत. 29 किंवा 30 तारखेला मतदार संघ जाहीर करू. तेव्हाच उमेदवार ही जाहीर करू. चिन्ह आल्याशिवाय उपयोग नाही असं मनोज जरांगे म्हणाले आहेत. दरम्यान, निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या तारखांनुसार विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. 29 ऑक्टोबर ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख असणार आहे.

आधी मराठा आरक्षणाची मागणी, नंतर महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांवर मराठा उमेदवार, पाडापाडीचं गणित असं जाहीर करणाऱ्या मनोज जरांगे यांनी एकाच जातीच्या पाठिंब्यावर निवडणूक लढवता येणार नाही. सर्वांना सोबत घेऊन राजकीय समिकरण जुळवणार असंल्याचं वक्तव्य केलं आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आता अवघे ४ दिवस शिल्लक असताना राजकीय समिकरण जुळवून कोणत्या मतदारसंघात उमेदवारी जाहीर करायची हे मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे ठरवणार आहेत. त्यासाठी सुरवातीला संभाजीनगर जिल्हातील इच्छुक उमेदवारांची बैठक होणार आहे. या बैठकीत एका मतदारसंघात एकच उमेदवार उभा रहावा या साठी मनोज जरांगे मार्गदर्शन करतील. 25 ते 27 या काळात आपलं राजकीय समिकरण जुळेल असं त्यांनी माध्यमांना सांगितलं.निवडणूक लढवण्याची भूमिका जाहीर केल्यानंतर त्यांच्याकडे इच्छुक उमेदवारांचे अनेक अर्ज आल्याचे त्यांनी सांगितले. 20 ऑक्टोबरला इच्छुकांची बैठक घेत लढायचं की पाडायचं हे त्यांनी ठरवलं होतं. काही ठराविक मतदारसंघातून उमेदवार उभे करण्याचेही त्यांनी सांगितलं होतं. कोणत्या मतदारसंघात उमेदवार उभे करायचे हे पुढच्या बैठकीत ठरवू असंही ते म्हणाले होते. 24 ऑक्टोबरला म्हणजे आज इच्छुकांची अंतरवली सराटीत बैठक चालू आहे. पण आज उमेदवार जाहीर करणार नसल्याचं त्यांनी सांगितलं. 29 ते 30 तारखेला मतदार संघ जाहीर करून उमेदवार जाहीर करू असेही ते म्हणालेत. एकाच वेळी ते मतदारसंघ निहाय उमेदवार जाहीर करणार आहेत. तर दुसरीकडे एकच उमेदवार ठरवण्याचं आज फायनल करू असेही ते म्हणाले आहेत. त्यामुळे मनोज जरांगे हे संभ्रमात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली। आहे.

काही मतदारसंघांमध्ये एकच उमेदवार देण्यावाचून पर्याय नाही असं विधान मनोज जरांगे यांनी केलं आहे, 29 किंवा 30 तारखेला मतदार संघ आणि उमेदवार ठरवू असंही ते म्हणाले आहेत,त्यामुळे जरांगे समर्थकात थोडा संभ्रम निर्माण झाला आहे.

अंतरवालीत बोलताना जरांगे म्हणाले की, प्रत्येकालाच उभं राहायचं आहे त्यामुळे मी सर्वांना बोलवून घेईन. ज्यांनी ऐकले नाही त्यांच्यावरही नाराज होणार नाही. सर्वांनी 30-40 दिवस कष्ट घेतले तर पाच वर्ष सर्व जनता आनंदी राहील असं भावनिक आवाहन करीत आज ते उमेदवार जाहीर करणार नसल्याचं जरांगे यांनी स्पष्ट केलंय.ते म्हणाले सर्वांना हात जोडून विनंती करतो की एकच जण उभा रहा. किती मतदारसंघ का
लढायचे हे आज जाहीर करायचे नाही.

प्रत्येक मतदारसंघात चार ते पाच जणांनी फॉर्म भरून ठेवायचे आहेत. 29 किंवा 30 तारखेला मतदार संघ जाहीर करू. तेव्हाच उमेदवार ही जाहीर करू. चिन्ह आल्याशिवाय उपयोग नाही असं मनोज जरांगे म्हणाले आहेत. दरम्यान, निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या तारखांनुसार विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. 29 ऑक्टोबर ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख असणार आहे.

आधी मराठा आरक्षणाची मागणी, नंतर महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांवर मराठा उमेदवार, पाडापाडीचं गणित असं जाहीर करणाऱ्या मनोज जरांगे यांनी एकाच जातीच्या पाठिंब्यावर निवडणूक लढवता येणार नाही. सर्वांना सोबत घेऊन राजकीय समिकरण जुळवणार असंल्याचं वक्तव्य केलं आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आता अवघे ४ दिवस शिल्लक असताना राजकीय समिकरण जुळवून कोणत्या मतदारसंघात उमेदवारी जाहीर करायची हे मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे ठरवणार आहेत. त्यासाठी सुरवातीला संभाजीनगर जिल्हातील इच्छुक उमेदवारांची बैठक होणार आहे. या बैठकीत एका मतदारसंघात एकच उमेदवार उभा रहावा या साठी मनोज जरांगे मार्गदर्शन करतील. 25 ते 27 या काळात आपलं राजकीय समिकरण जुळेल असं त्यांनी माध्यमांना सांगितलं.निवडणूक लढवण्याची भूमिका जाहीर केल्यानंतर त्यांच्याकडे इच्छुक उमेदवारांचे अनेक अर्ज आल्याचे त्यांनी सांगितले. 20 ऑक्टोबरला इच्छुकांची बैठक घेत लढायचं की पाडायचं हे त्यांनी ठरवलं होतं. काही ठराविक मतदारसंघातून उमेदवार उभे करण्याचेही त्यांनी सांगितलं होतं. कोणत्या मतदारसंघात उमेदवार उभे करायचे हे पुढच्या बैठकीत ठरवू असंही ते म्हणाले होते. 24 ऑक्टोबरला म्हणजे आज इच्छुकांची अंतरवली सराटीत बैठक चालू आहे. पण आज उमेदवार जाहीर करणार नसल्याचं त्यांनी सांगितलं. 29 ते 30 तारखेला मतदार संघ जाहीर करून उमेदवार जाहीर करू असेही ते म्हणालेत. एकाच वेळी ते मतदारसंघ निहाय उमेदवार जाहीर करणार आहेत. तर दुसरीकडे एकच उमेदवार ठरवण्याचं आज फायनल करू असेही ते म्हणाले आहेत. त्यामुळे मनोज जरांगे हे संभ्रमात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली। आहे.

Previous Post

बदामराव पंडित गेवराईतून…

Next Post

एकच उमेदवार द्यावा लागेल; जरांगे समर्थक संभ्रमात

महेश माधवराव वाघमारे

महेश माधवराव वाघमारे

विकास वामनराव कुलकर्णी (उमापूरकर ) -कार्यकारी संपादक.-

Next Post

एकच उमेदवार द्यावा लागेल; जरांगे समर्थक संभ्रमात

ताज्या बातम्या

कामधेनू केअर सेंटर ही काळाची गरज-पाचपोर महाराज.

July 31, 2025

उद्योजक प्रकाश सुलाखे डॉ.श्यामा प्रसाद मुखर्जी स्मृती पुरस्काराने सन्मानित

July 28, 2025

पुन्हा भेटताही येत नाही…! विसरता ही येत नाही…!

July 12, 2025

बिंदुसरा स्वच्छ झाली ; आ.संदीप क्षीरसागरांनी मानले अजितदादांचे आभार

June 7, 2025

भाजप जिल्हाध्यक्षपदी शंकर देशमुख कायम.

May 31, 2025

धार्मिक ऐक्यासाठी समस्त जातींचे संघटन करण्याचे महान कार्य वीर सावरकरांनी केले-डॉ. सारिका क्षीरसागर.

May 28, 2025

  • Contact Us
  • Home

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.