• Contact Us
  • Home
Monday, December 1, 2025
  • Login
Ugavatiche Rang
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
No Result
View All Result

पटसंख्या 100 असणाऱ्या शाळेलाही आता मुख्याध्यापक.

महेश माधवराव वाघमारे by महेश माधवराव वाघमारे
October 6, 2024
in ताज्या बातम्या
0

जिल्हा परिषदेच्या शाळेतील 150 हून कमी पटसंख्या असल तर मुख्याध्यापकपद हटविण्याच्या निर्णयाला झालेल्या विरोधासमोर शासनाने नमते घेतले आहे.

राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने आता 100 पटसंख्या असलेल्या शाळांना मुख्याध्यापक पद मिळणार आहे. याबाबत नुकताच शासनाने निर्णय घेतला आहे.

राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाने 15 मार्च रोजी काढलेल्या शासन निर्णयानुसार 150 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमधून मुख्याध्यापकपद रद्द करण्यात येणार होते. अशा शाळांचा कारभार वरिष्ठ शिक्षकांकडे अतिरिक्त पदभार सोपविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. शासनाच्या शालेय शिक्षण विभागाच्या या निर्णयाला शिक्षक संघटनांनी कडाडून विरोध केला. महाराष्ट्र राज्य शिक्षक संघटना समन्वय समितीने 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांवर कंत्राटी शिक्षक नेमण्याच्या सरकारच्या निर्णयाविरोधात आंदोलनाचा इशारा दिला होता.
दरम्यान, शिक्षक संघटनांनी केलेल्या विरोधानंतर शिक्षण विभागाने 150 पटसंख्येचा निर्णय बदलण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आला आहे. शालेय शिक्षण विभागाच्या नवीन निर्णयानुसार आता 150 ऐवजी 100 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या अनेक शाळा झाल्या होत्या.

100 पटसंख्या असली तरीही मुख्याध्यापक

शाळांमध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या 100 असेल, तर अशा शाळांना मुख्याध्यापक मिळणार आहेत. शालेय शिक्षण विभागाच्या नव्या निर्णयामुळे जिल्ह्यातील शिक्षण विभागाने ठरवून दिलेल्या निकषानुसार आवश्यक पटसंख्या असलेल्या शाळांना मुख्याध्यापक मिळणार असल्याने शिक्षक वर्गात समाधान व्यक्त होत आहे.

शाळेच्या दृष्टीने मुख्याध्यापकपद अतिशय महत्त्वाचेशाळेच्या दृष्टीने मुख्याध्यापकपद अतिशय महत्त्वाचे

शाळेच्या दृष्टीने मुख्याध्यापकपद अतिशय महत्त्वाचे आहे. शिक्षण विभागाच्या 2015 च्या निर्णयानुसार मुख्याध्यापक पदासाठी 100 विद्यार्थी संख्या आणि पद टिकण्यासाठी 10 विद्यार्थी संख्या आवश्यक होती. या निर्णयात बदल करून विद्यार्थी संख्या 150 करण्यात आली होती. या निर्णयाला विरोध झाल्यामुळे आता मुख्याध्यापक पदासाठी पूर्वीचाच नियम लागू होणार आहे.

Previous Post

देशाची सांस्कृतिक विविधता मराठी भाषेमुळे समृद्ध

Next Post

सुरजला मिळाले 14 लाख अन ट्रॉफी

महेश माधवराव वाघमारे

महेश माधवराव वाघमारे

महेश वाघमारे, बीड

Next Post

सुरजला मिळाले 14 लाख अन ट्रॉफी

ताज्या बातम्या

युट्युब चॅनेलला न प निवडणुकीत मतदान केंद्रावर प्रवेश नाही.

युट्युब चॅनेलला न प निवडणुकीत मतदान केंद्रावर प्रवेश नाही.

November 26, 2025
पीएनजी ज्वेलर्स’तर्फे नव्या पिढीच्या वधूसाठी ‘प्रथा’ संग्रह सादर

पीएनजी ज्वेलर्स’तर्फे नव्या पिढीच्या वधूसाठी ‘प्रथा’ संग्रह सादर

November 18, 2025
स्मिता विष्णू वाघमारे एकमेव अनुभवी उमेदवार.

स्मिता विष्णू वाघमारे एकमेव अनुभवी उमेदवार.

November 17, 2025
वेळेवर निर्णय न घेतल्याने जयदत्त क्षीरसागर यांच्या समर्थकांची पांगापांग.

वेळेवर निर्णय न घेतल्याने जयदत्त क्षीरसागर यांच्या समर्थकांची पांगापांग.

November 17, 2025
आता भाजपातही क्षीरसागर:फडणवीसांनी केले स्वागत.

आता भाजपातही क्षीरसागर:फडणवीसांनी केले स्वागत.

November 16, 2025
विधानसभेसाठीची भाजपची पहिली यादी जाहीर; ‘या’ नावांवर शिक्कामोर्तब

बीड शहरात प्रथमच भाजप ठरू पाहतोय तुल्यबळ पक्ष.

November 16, 2025

  • Contact Us
  • Home

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.