• Contact Us
  • Home
Saturday, June 7, 2025
  • Login
Ugavatiche Rang
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
No Result
View All Result

मला ही “रामाचा दास” बनता येईल का….

महेश माधवराव वाघमारे by महेश माधवराव वाघमारे
February 3, 2025
in ऑनलाईन वृत्तसेवा, सांस्कृतिक
0

प्रमोद कुलकर्णी, बीड.


राष्ट्रगुरु श्री समर्थ रामदास स्वामी यांच्या विचार व कार्याची महती अवघ्या महाराष्ट्राला परिचित आहे. कर्मनिष्ठ जीवन प्रणाली या समर्थांच्या विचाराचा प्रचार व प्रसार करण्याच्या मुख्य हेतूने श्री क्षेत्र सज्जनगडावरून भिक्षा दौरा आयोजित केला जातो. समाजाच्या एकत्रीकरणासाठी उत्सव- महोत्सव साजरे करताना प्रत्येक घटकांचा सहकार्यातून सहभागातून ते साजरे व्हावेत म्हणून भिक्षेचा दंडक आहे. 377 वर्षापासून ची ही परंपरा आहे. सज्जनगडावरून दासनवमी, रामनवमी, गुरुपौर्णिमा असे उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे होतात. वर्षभर गडावर लाखो भाविक भक्त येत असतात ,त्यांची निवास व भोजनाची व्यवस्था संस्थान तर्फे विनामूल्य केली जाते. श्रीराम मठ- हनुमान मंदिरे- शाळा -संस्कार वर्ग- कीर्तन, प्रवचन- उपासना केंद्र या माध्यमातून सज्जनगडाचे सक्रिय योगदान आहे . बलोपासना आणि ज्ञानोपासना चे धडे समाज रुजवण्यासाठी उपक्रम राबवले जातात. हे सर्व चालते ते भिक्षेच्या माध्यमातून या “सज्जनगडाच्या धर्मकार्यात” आपलाही सहभाग असावा म्हणून आपली भिक्षा, समर्थ झोळीत अर्पण करून सेवेचा लाभ बीड शहरवासीयांनी 24 ते 31 जानेवारी दरम्यान मिळवला.


सकाळच्या काकड आरतीने प्रभू श्रीराम, भगवंत, सद्गुरु यांच्यासाठी, त्यांच्याप्रती श्रद्धा भाव ,वंदन, प्रार्थना करून दिवसाची प्रसन्न सुरुवात कशी असावी? याचा प्रत्यय पाहायला मिळाला. उपासना- कीर्तन, प्रवचन- आरती अशा संस्कारातून मन ईश्वरचरणी लिन करत कर्मनिष्ठा समजून घेता आली.
श्री समर्थांच्या पादुकाचे पूजन घरोघरी होत असताना समर्थांची ओळख, त्यांचे विचार, कार्य त्यांनी घालून दिलेले दंडक याची उजळणी होते. मनाचे श्लोक आणि समर्थांच्या चरणपादुकांचे मनोभावे दर्शन घेत साक्षात “समर्थ” आपल्यासमोर ,आपल्या घरात उपस्थित आहेत, कुटुंबाला आणि आपल्या वंशाला भरभरून आशीर्वाद देत आहेत हा भाव आणि वातावरण तयार होते, हे भाग्य मला लाभले .ज्या -ज्या वेळी पादुकेला अत्तर लावताना पूजा पाहत होतो,त्या- त्या वेळी दर्शन घेत होतो, तेव्हा मन भरून कंठ दाटून येत होता. पादुकांचे प्रस्थान बीडमधून आंबेजोगाई कडे होत असताना अश्रूंना तो बांध मोकळा करून द्यावा लागला.
मी किंवा आपल्यापैकी कोणीही समर्थांना प्रत्यक्षात पाहिलेले नाही पण या श्री समर्थ रामदास स्वामी पादुका बीड प्रचार दौरा व भिक्षा फेरीमुळे समर्थ सोबत मी आठ दिवस राहिलो , ही अनुभूती घेतली. कधी पादुकांमधून समर्थ दिसायचे तर कधी श्री भूषण स्वामींच्या प्रत्यक्ष दर्शनातून .कधी भिक्षा वाढणाऱ्या माता- भगिनी, पुरुष मंडळीतूनही पाहता आले .कधी झोळी घेऊन समर्थ दिसले. प्रमोद, प्रसादाला दिसला नाहीस, घेतला का ? या सौ. निलिमा वहिनीच्या वाणीतून समर्थ बोल ऐकले. प्रमोद, तुमच्यामुळे समर्थांचे दर्शन झाले, आमच्या घरी पादुका आल्या या प्रतिक्रियेमुळे तर मी समर्थांच्या सेवेत असल्याने कंठ दाटून येत होता. त्यांचें ऋण मी व्यक्त करत होतो.
प्रा.डाॅ. दीपकदादा देशमुख यांचा संयमी स्वभाव, समर्थ भक्त कृष्णा महाराज रामदासी यांचा स्वामीभाव व लिनता, श्री विनायक महाराज पाटगंणकर यांचा विनम्र स्वभाव. श्री संजयराव कुलकर्णी यांचा प्रेमळ सुगंध ,पत्रकार श्री अतुल कुलकर्णी यांची कर्मनिष्ठा, श्री मुकुंदराव कुलकर्णी यांचा कर्तव्य पारंगतता, रामदासी मंडळीची सेवाभाव. धर्म आणि सर्व धार्मिक कार्यक्रम उपक्रमातून पुढाकार आणि उत्साह धमक ठेवून आम्हाला प्रेरक असणारे कार्याध्यक्ष संपादक दिलीपराव खिस्ती ,महेश काका वाघमारे, बीड शहरात सद्गुरु ह. भ. प. महादेव महाराज चाकरवाडीकर आणि लोकप्रतिनिधी आ.संदीप भैया क्षिरसागर यांच्या सह अनेक समर्थ भक्तांच्या उपस्थितीत ,योग शिक्षक विनायक वझे यांच्या विद्यार्थ्यांचें मल्लखांब प्रात्यक्षिके,भव्य- दिव्य समर्थांच्या स्वागतासाठी समर्पित झालेले संस्कार भारतीचे प्रमोद वझे, संतोष चिंचोलकर यांनी धोंडीपुऱ्यात केलेले समर्थांचे स्वागत. प्रा चंद्रकांतराव मुळे सरांकडील प्रसादाचे पादुका पूजन. समर्थ भक्त भूषण कुलकर्णी यांच्या आर्त प्रेमामुळे समर्थांचा गेवराई प्रवास,
माझ्या रेणुका प्राइड मधील सर्व मंडळीचा मोठा उत्साह, डोरले काका आणि अनिल भाऊ घुमरे यांची उपस्थिती सहकार्य. समर्थ भक्त चैतन्य इनामदार गुरुजींचा पूजा विधि डोक्यात आणि हृदयात रुजला .कोषाध्यक्ष म्हणून जोखीम उचलणारे विकास उमापूरकर, सेवेकरी बाळासाहेब थिगळे ,स्वा.सावरकर, चंपावती संस्कार अशा विविध शिक्षण क्षेत्रातील मंडळीचा पूर्णवादी बँक परिवार आणि चेअरमन डॉक्टर सुभाष जोशी, माजी मंत्री जयदत्त आण्णा सह लहान थोर हाजोरो भिक्षा घालणारेअज्ञात हात, समर्थ भक्त, सेवेकरी,यांचा सार्थ सहभाग.
बीड शहराची मोठी भिक्षा अर्पण आणि मोठ्या समर्थ भक्तांचा सहभाग मिळाला याचा मोठा आनंद सर्वांनाच आहे, हे समर्थ विचारांचा प्रचार आणि प्रसाराचे कार्य सज्जनगड संस्थांनच्या पुढाकारातून झाले पण यानिमित्ताने श्री समर्थ रामदास स्वामींनी घालून दिले दंडक, बलोपासना, ज्ञानोपासना, कर्मनिष्ठा हे आपल्या जीवन प्रणालीचा नित्याचा भाग ठरतील. आपल्यालाही त्यांच्यासारखं “रामाचा दास” होता येईल… हा संकल्प आणि आचरण करण्याचा आपण यापुढे प्रयत्न करूया हीच समर्थांची चरणी प्रार्थना आणि आपली कर्मनिष्ठा जपूया…
जय जय रघुवीर समर्थ….
प्रमोद कुलकर्णी पत्रकार बीड
(९४०३९०४६५१) दि,१ फेब्रुवारी २५.

Previous Post

भारताने टी-20 क्रिकेट विश्वचषक जिंकला.

Next Post

महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल स्वस्त, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर

महेश माधवराव वाघमारे

महेश माधवराव वाघमारे

विकास वामनराव कुलकर्णी (उमापूरकर ) -कार्यकारी संपादक.-

Next Post

महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल स्वस्त, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर

ताज्या बातम्या

बिंदुसरा स्वच्छ झाली ; आ.संदीप क्षीरसागरांनी मानले अजितदादांचे आभार

June 7, 2025

भाजप जिल्हाध्यक्षपदी शंकर देशमुख कायम.

May 31, 2025

धार्मिक ऐक्यासाठी समस्त जातींचे संघटन करण्याचे महान कार्य वीर सावरकरांनी केले-डॉ. सारिका क्षीरसागर.

May 28, 2025

सोयाबीन, तूर, मुगाची आधारभूत किंमत वाढवली…

May 28, 2025

आला रे आला ,मान्सून आला..

May 25, 2025

भारतीय संघाच्या कर्णधारपदी शुभमन गिल.

May 24, 2025

  • Contact Us
  • Home

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.