
क्वालालंपूर -भारताने सलग दुसऱ्यांदा महिला अंडर-19 टी-20 विश्वचषक जिंकला आहे. भारतीय संघाने अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 9 विकेट्सने पराभव केला. भारताने 2023 मध्ये या स्पर्धेचे पहिले विजेतेपद जिंकले.रविवारी क्वालालंपूर येथे झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि २० षटकांत ८२ धावांवर सर्वबाद झाले.
प्रत्युत्तरात, भारतीय संघाने 11.2 षटकांत 1 गडी गमावून 83 धावांचे लक्ष्य गाठले. त्रिशाने 33 चेंडूत 44 धावांची खेळी केली. तिने ३ विकेट्सही घेतल्या. सानिका चालकेने 22 चेंडूत 26 धावांची नाबाद खेळी केली.
दोन्ही संघांनी उत्कृष्ट कामगिरी करत अंतिम फेरीत प्रवेश केला होता. भारताच्या 19 वर्षांखालील महिला संघात सानिका चालके, गोंगडी त्रिशा आणि वैष्णवी शर्मा सारख्या प्रमुख खेळाडू आहेत, ज्यांच्याकडून चमकदार कामगिरीची अपेक्षा आहे, अर्थात त्यांनी ती सिद्ध देखील करून दाखवली आहे.