
जालना (प्रतिनिधी) मनोज जरांगे पाटील हे सातव्यांदा उपोषणासाठी बसले होते. आंतरवाली सराटीत उपोषण सुरु केले होतं. गेल्या पाच दिवसांपासून हे उपोषण चालू आहे. आता मनोज जरांगे पाटील यांनी मोठी घोषणा केली असून आम्ही गेले पावणे दोन वर्षे आंदोलन केली. मात्र आता वेगळ्या मार्गाने झकपक म आंदोलन करणारअसा इशारा त्यांनी दिला आहे मात्र झकपक आंदोलन म्हणजे नेमके काय असेल हे त्यांनी स्पष्ट केले नाही.मनोज जरांगे पाटील हे गेल्या ५ दिवसांपासून उपोषणासाठी बसले आहेत. सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या, ‘सगे सोयरे’ अंमलबजावणी तातडीने करा, शिंदे समितीला तातडीने मुदतवाढ द्या, कक्ष सुरू करा, वंशावळ समिती गठीत करा, शिंदे समिती मनुष्यबळ वाढवा, संख्याबळ द्या,नोंदी सापडलेल्या लोकांना प्रमाणपत्र द्या, अशा मागण्या त्यांनी सरकारपुढे ठेवल्या आहेत. आज मनोज जरांगे पाटील यांनी एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडण्याबद्दल मोठे विधान केले. उद्या दुपारी बारा वाजेपर्यंत उपोषण सोडण्याबद्दल मराठा समाजाशी बोलून निर्णय घेणार आहे, असे ते म्हणाले.
“मी आता उपोषण करणार नाही. पण आता झक पक आंदोलन करणार आहे. उद्या दुपारी बारा वाजता उपोषण सोडण्याबाबत मराठा समाजाशी बोलून निर्णय घेणार आहे. आज रात्री किंवा सकाळी मराठा समाजाशी बोलून उपोषण सोडणार” अशी मोठी घोषणा त्यांनी केली.
संतोष देशमुख हत्या प्रकरण मागे पडू देणार नाही
“आमचे डोळे उघडले आणि मराठा समाजाचे डोळे उघडले आहेत. खऱ्या आरक्षणाचा मारेकरी कोण हे सर्वांना माहित झालं आहे. देवेंद्र फडणवीस जाणून बुजून काम करत नाही, हे मराठा समाजाला कळलं आहे. संतोष देशमुखांचा प्रकरण आमच्यासाठी महत्त्वाचं आहे. धनंजय देशमुख यांना सकाळी मी बोललो आहे की मी संतोष देशमुखांचे प्रकरण मागे पडू देणार नाही”.
“फडणवीस साहेब आता लय दिवस आनंद राहणार नाही”
मी समाजाशी बोलून थोड्या वेळात उपोषणाची भूमिका कळवतो. आज रात्री किंवा सकाळी बोलतो. त्यानंतर माझी भूमिका कळवतो. एवढे दिवस आम्हाला उपोषण करायची वेळ येईल हे अपेक्षितच नव्हतं. फडणवीस मराठ्यांशी गद्दारी करणार असं आम्हाला वाटत नव्हतं. मी उपोषणाला बसलो आणि सिद्ध झालं की देवेंद्र फडणवीस मराठा समाजाच्या मागण्याकडे लक्ष देत नाही. मराठा समाजाच्या मागणीची अंमलबजावणी होईल असा आम्हाला वाटत होतं. परंतु लक्षात आलं की मराठ्यांना काही द्यायचं नाही. आम्ही सकाळी सांगितलं होतं फडणवीसांना आमच्या मागण्या मान्य करायच्या का नाही, हे बोललं पाहिजे होतं. परंतु ते काही बोलले नाही. त्यामुळे सिद्ध झालं आहे की मराठा समाजाच्या आरक्षणाचा मारेकरी कोण आहे?
फडणवीस साहेब, आता आनंद लय दिवस राहणार नाही, आनंदावर विरजन पडेल. ज्या दिवशी बोलायचं त्या दिवशी तुम्हाला सांगेल. खरी चूक कोणाची आहे हे मराठा समाजाला कळालं आहे. आता आमच्या पद्धतीने आम्ही आंदोलन करू आणि आम्ही आता वेगळ्या पद्धतीने आंदोलन करू. बेईमानी आणि गद्दारी फडणवीस यांच्याकडून होईल असे वाटले नव्हते. जे हक्काचे आहे ते आरक्षण देत नाहीत. आम्हाला उपोषण करायचे नव्हते. आम्हाला वाटले, दोन दिवसात मागण्या पूर्ण होतील. फडणवीस यांनी मात्र चुप्पी साधली. मराठा समाजाविषयी त्यांना किती द्वेष आणि आकस आहे हे दिसून आले. फडणवीस किती मराठाद्वेषी आहेत, हे उघडे पडले आहे. आंदोलन सोडल्यानंतर त्यांना सोडणार नाही असे जरांगे पाटील म्हणाले.
आता झक पक आंदोलन करणार
“देवेंद्र फडणवीस गद्दारी करतील, असे स्वप्नात वाटले नव्हते. आज रात्री किंवा सकाळी मराठा समाजाशी बोलून उपोषण सोडणार आहे. देवेंद्र फडवणीस यांनी मराठ्यांचे मने जिंकायला पाहिजी होती, मी बोलायला सुरू करेल, तेव्हा तुम्हाला तिन्ही ताळात जागा राहणार नाही. मराठ्यांनी सावध व्हावे, मुला-बाळांचे वाटोळे होऊ देऊ नका. पावणे दोन वर्षे आंदोलन केली. आता वेगळ्या मार्गाने आंदोलन करणार आहे. मराठा समाज उपोषण करणार नाही, पण आता झक पक आंदोलन करणार आहे. उद्या दुपारी बारा वाजता उपोषण सोडण्याबाबत समाजाशी बोलून निर्णय घेणार आहे”, असेही जरांगे पाटील म्हणाले.