• Contact Us
  • Home
Monday, August 4, 2025
  • Login
Ugavatiche Rang
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
No Result
View All Result

उपमुख्यमंत्री अजित पवार बीडमध्ये येताच सर्वात मोठी घडामोड..

महेश माधवराव वाघमारे by महेश माधवराव वाघमारे
January 21, 2025
in ऑनलाईन वृत्तसेवा, बीड जिल्हा
0

उपमुख्यमंत्री अजित पवार बीडमध्ये येताच सर्वात मोठी घडामोड, 13 सरपंच आणि 418 ग्रामपंचायत सदस्यांचं सदस्यत्त्व रद्द….

बीड(प्रतिनिधी) परळी पॅटर्न, पीक विमा, हार्वेस्टर घोटाळ्यानंतर आता जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी जात वैधता पत्र सादर न करणाऱ्या सरपंच आणि ग्राम पंचायत सदस्य यांच्या निवडी रद्द केल्या आहेत.निवडी रद्द केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.यापुढे नवे पालकमंत्री अजित पवार आणि जिल्हाधिकारी अविनाश पाठक यापेक्षा कठोर निर्णय घेण्याची शक्यता आहे.विशेष म्हणजे सोमवारी रात्री उशिरा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीडला उशिरा धावती भेट दिली आहे.

सरपंचांसह सदस्यांना मोठा दणका

बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी जिल्ह्यातील 13 सरपंच तर 418 सदस्यांचे सदस्यत्व रद्द केले आहेत. जात वैधता प्रमाणपत्र वेळेत सादर न केल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी हे आदेश दिले आहेत. या आदेशाने राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी आष्टी, अंबाजोगाई, वडवणी, पाटोदा, माजलगाव, केज आणि धारूर तालुक्यातील 413 ग्रामपंचायत सदस्य आणि 13 सरपंचाचे सदस्य रद्द केले आहे.

मुदत उलटूनही जात प्रमाणपत्र सादर नाही

अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती नागरिकांचा मागास प्रवर्गासाठीच्या राखीव असलेल्या जागांवर निवडणूक लढविणाऱ्या व्यक्तीस जातीचे प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र निवडून आलेल्या दिनांका पासून बारा महिन्यांच्या कालावधीत सादर करणे आवश्यक आहे. मात्र 2020 पासून पुढे झालेल्या ग्रामपंचायत सार्वत्रिक व पोटनिवडणुकीमध्ये राखीव प्रवर्गातून निवडून आलेल्या अनेक सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांनी त्यांचे जात वैधता प्रमाणपत्र विहित मुदतीत सादर न केल्याने त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. परिणामी जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी आष्टी, अंबाजोगाई, वडवणी, पाटोदा, माजलगाव, केज आणि धारूर तालुक्यातील 413 ग्रामपंचायत सदस्य आणि 13 सरपंचाचे सदस्य रद्द केले आहे.

32 जात वैधता समितींना अध्यक्षाची प्रतिक्षा

दरम्यान राज्यातील जात वैधता प्रमाणपत्र समित्या या विना अध्यक्षच गाडा हाकत असल्याचे समोर येत आहे. राज्यातील 32 जात वैधता प्रमाणपत्र समितींना अध्यक्षचं नसल्याचा आरोप काँग्रेस नेते नितीन राऊत यांनी केला आहे. राज्यात केवळ 4 समित्यांवरच अध्यक्ष असल्याचे ते म्हणाले. त्यामुळे जखम डोक्याला आणि इलाज पायाला अशी अवस्था असल्याचा आरोप करण्यात येत आहे. तर दुसरीकडे अनेक सरपंच हे या निर्णयाविरोधात हायकोर्टात धाव घेण्याच्या तयारीत असल्याचे समजते.

Previous Post

हजारो कीर्तनकार,प्रवचनकार घडवणारे साखरे महाराज निवर्तले..

Next Post

बनावट चलनी नोटांमध्ये मनिष क्षीरसागर यास अटक;आठवले गँगचा सहभाग निश्चित.

महेश माधवराव वाघमारे

महेश माधवराव वाघमारे

विकास वामनराव कुलकर्णी (उमापूरकर ) -कार्यकारी संपादक.-

Next Post

बनावट चलनी नोटांमध्ये मनिष क्षीरसागर यास अटक;आठवले गँगचा सहभाग निश्चित.

ताज्या बातम्या

कामधेनू केअर सेंटर ही काळाची गरज-पाचपोर महाराज.

July 31, 2025

उद्योजक प्रकाश सुलाखे डॉ.श्यामा प्रसाद मुखर्जी स्मृती पुरस्काराने सन्मानित

July 28, 2025

पुन्हा भेटताही येत नाही…! विसरता ही येत नाही…!

July 12, 2025

बिंदुसरा स्वच्छ झाली ; आ.संदीप क्षीरसागरांनी मानले अजितदादांचे आभार

June 7, 2025

भाजप जिल्हाध्यक्षपदी शंकर देशमुख कायम.

May 31, 2025

धार्मिक ऐक्यासाठी समस्त जातींचे संघटन करण्याचे महान कार्य वीर सावरकरांनी केले-डॉ. सारिका क्षीरसागर.

May 28, 2025

  • Contact Us
  • Home

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.