• Contact Us
  • Home
Monday, August 4, 2025
  • Login
Ugavatiche Rang
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
No Result
View All Result

उगीच बारामती होत नाही त्यासाठी 24 तास झटावे लागते- अजित पवार

महेश माधवराव वाघमारे by महेश माधवराव वाघमारे
November 13, 2024
in ऑनलाईन वृत्तसेवा
0

बीड (प्रतिनिधी)
बारामती सारखा विकास उगीच होत नाही ,त्यासाठी गेल्या पंचवीस तीस वर्षापासून तिथला लोकप्रतिनिधी 24 तास राबतोय ,सकाळपासून संध्याकाळपर्यंत वेगवेगळ्या कामाकडे लक्ष देतो तेव्हा कुठे बारामती आणि बारामती सारखा विकास होऊ शकतो असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी बीड येथे बोलताना केले.

महायुतीचे उमेदवार डॉक्टर योगेश क्षीरसागर यांच्या प्रचार सभेत बीड येथे बोलताना अजित पवार म्हणाले की बारामतीचा विकास हा सहज झाला नाही त्यासाठी ,तिथल्या लोकप्रतिनिधीने 25- 30 वर्ष घातले आहेत. कोणत्याही मतदारसंघाच्या विकासासाठी तिथला लोकप्रतिनिधी सक्षम असावा लागतो. विकास कामांना प्राधान्य द्यावे लागते. मी महायुतीच्या सरकारमध्ये राष्ट्रवादीच्या सर्वच्या सर्व आमदारांच्या मागणीमुळे सहभागी झालो आहे. कारण महाआघाडी सरकारचे दीड वर्ष करोणातच गेले होते. आमचे सारे आमदार म्हणाले की ,जनतेची कामे ठप्प झाली आहेत पुन्हा आपल्या मतदारसंघाचा विकास करायचा असेल तर मतदार संघातील कामे दाखवावी लागतील आणि ही कामे आपल्याला सरकारमध्ये गेल्याशिवाय करता येणार नाहीत, म्हणून मी महायुती सरकारमध्ये सहभागी झालो .

कोणत्याही मतदारसंघाचा विकास करण्यासाठी तिथे एमआयडीसी आणि त्याला जोडून विमानतळ असावे लागते. इथल्या नेत्यांनी बीडमध्ये उद्योगधंदे यावे अशी मागणी केली आहे. आगामी काळात ही मागणी मी नक्कीच पूर्ण करेल .जे काम पूर्ण करता येऊ शकते त्याचीच मी शाश्वती देत असतो ,म्हणून मी आगामी काळात बीडला नक्कीच औद्योगिक वसाहत उभा करून दाखवील असे अजित पवार म्हणाले. येत्या काळात पाणीपट्टी देखील कमी केली जाणार आहे कारण सर्व पाणीपुरवठा योजना या सोलारशी जोडण्यात येणार आहेत. त्यामुळे पाणीपट्टी नक्कीच कमी होईल. अजित पवार म्हणाले की,आपण मुस्लिम समाजाला दहा टक्के जागा दिल्या आहेत आणि त्याही निवडून येणाऱ्या, आष्टी -पाटोदा- शिरूर सारखाय नाही असा टोला त्यांनी यावेळी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मारला. जुन्या आमदाराने काम करणे बंद केले होते असा आरोप ही त्यांनी संदीप क्षीरसागर यांचे नाव न घेता केला .या जाहीसभेस आष्टीचे उमेदवार बाळासाहेब आजबे उपस्थित होते .व्यासपीठावर उमेदवार योगेश क्षीरसागर ,पालकमंत्री धनंजय मुंडे हे उपस्थित होते जाहीर सभेस लोकांनी मोठ्या संख्येने प्रतिसाद दिला.

Previous Post

जयभवानी साखर कारखाना गळीत हंगामाचा शुभारंभ

Next Post

विजयसिंहांकडे विकासाचे व्हिजन- अजीत पवार

महेश माधवराव वाघमारे

महेश माधवराव वाघमारे

विकास वामनराव कुलकर्णी (उमापूरकर ) -कार्यकारी संपादक.-

Next Post

विजयसिंहांकडे विकासाचे व्हिजन- अजीत पवार

ताज्या बातम्या

कामधेनू केअर सेंटर ही काळाची गरज-पाचपोर महाराज.

July 31, 2025

उद्योजक प्रकाश सुलाखे डॉ.श्यामा प्रसाद मुखर्जी स्मृती पुरस्काराने सन्मानित

July 28, 2025

पुन्हा भेटताही येत नाही…! विसरता ही येत नाही…!

July 12, 2025

बिंदुसरा स्वच्छ झाली ; आ.संदीप क्षीरसागरांनी मानले अजितदादांचे आभार

June 7, 2025

भाजप जिल्हाध्यक्षपदी शंकर देशमुख कायम.

May 31, 2025

धार्मिक ऐक्यासाठी समस्त जातींचे संघटन करण्याचे महान कार्य वीर सावरकरांनी केले-डॉ. सारिका क्षीरसागर.

May 28, 2025

  • Contact Us
  • Home

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.